तालुक्यातील तीन साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलासाठी एक दिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा
करमाळा समाचार
तालुक्यातील तीन साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन करमाळा तहसीलदार समीर माने यांच्याकडे देण्यात आले आहे. दि ३० रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे, तरी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.


२०२१ चा हंगाम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी करमाळा तालुक्यातील कमलाई, मकाई व भैरवनाथ या कारखान्यांनी शेतकऱ्याच्या उसाची बिले दिले नाहीत. याबाबत मकाई सहकारी साखर कारखान्यावर साखर आयुक्त यांनी मार्च २०२१ मध्ये आर. आर. सी. ची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी सोलापूर यांनी तहसिलदार कार्यालयाला दिलेला आहे. परंतु आदेशाला चार महिने उलटूनही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. तरी आर आर सीच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी. मकाई सहकारी साखर कारखाना व इतर कारखान्याचे थकीत वीजबिल शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी.
तसेच गेल्या तीन वर्षाखाली कमलाई साखर कारखान्याच्या वाहतूकदारांच्या नावे बोगस काढलेले आहे व ते कारखान्यांनी भरलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना बँकेतून पीक कर्ज घेण्यास अडचण येत आहे. शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाले आहे. तरी सर्व मागण्यांसाठी शेतकरी संघटनेकडून ३० रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदरच्या निवेदनावर तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, तालुका पक्षाध्यक्ष बापु फरतडे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे आदींच्या सह्या आहेत. सदरची निवेदन नायब तहसीलदार विजय कुमार जाधव यांच्याकडे देण्यात आले