राजकीय हस्तक्षेपामुळे रखडले जेऊरवाडीगावचे पाणी
करमाळा समाचार
दहिगाव उपसा सिंचन योजनेत पहिल्या क्रमांकाचे गाव असतानाही जेऊरवाडी येथे पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून ग्रामस्थ करमाळा येथे अमरण उपोषणासाठी बसले आहेत. यावेळी गावातील 50 ते 60 ग्रामस्थ बसलेले असताना दुपारपर्यंत एकही अधिकारी त्यांच्यापर्यंत फिरकले नव्हते. जमिनी जाऊन राजकारणामुळे अन्याय होत असल्याचे भावना गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

यावेळी सदर उपोषणाला योगेश निमगिरे, हनुमंत निमगिरे, दीपक निमगिरे, नामदेव नेमगिरे, गणेश क्षीरसागर निमगिरे, अनिरुद्ध वाघमोडे, सागर वाघमोडे, विजय निमगिरे, विकास निमगिरे, गोरख शिंदे, नवनाथ शिरसकर, जितेंद्र निमगिरे, विलास गेंड, संदिपान वाघमोडे, गणेश वाघमोडे, संपत निमगिरे, सुनील निमगिरे, मारुती निमगिरे, महादेव निमगिरे, दादासाहेब निलगिरे आदी उपस्थित होते.
