करमाळासोलापूर जिल्हा

आवाटी ग्रामपंचायत सरपंचपदी नारायणआबा पाटील व मोहिते पाटिल गटाच्या सौ. बंडगर यांची निवड

करमाळा (प्रतिनिधी) :

करमाळा तालुक्यातील आवाटी गावच्या सरपंचपदी नारायणआबा पाटील गटाच्या सौ.आशाबाई सोमनाथ बंडगर यांची बिनविरोध निवड झाली आहे. श्री. संजय नलवडे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आवाटी ग्रामपंचायत सदस्य संख्या 9 असून त्यापैकी परिवर्तन पॅनलकडे 6 सदस्य आहेत. परिवर्तन पॅनलकडे स्पष्ट बहुमत असूनही ऐनवेळी काहीही घडू शकते, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. परिवर्तन पॅनलचे सर्व सदस्य एकविचाराने ठाम राहिले. इथून पुढेही आम्ही एकत्र राहून सत्ता कायम ठेऊ. असे नुतन सरपंच सौ.बंडगर यांनी सांगितले.

यावेळी परिवर्तन पॅनल प्रमुख माजी सरपंच संजय नलवडे, उपसरपंच सौ. साबेराबी जहागीरदार, माजी उपसरपंच जावेद मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य सौ. बाई बडेमिया खान, सौ. रुक्मिणी नलवडे, श्री. दशरथ शिंदे, श्री.आप्पाराव बंडगर, सौ.ठकूबाई शिंदे, माजी सरपंच दादासाहेब बंडगर, बाजार समितीचे माजी संचालक नसरूल्ला खान, मकाई कारखान्याचे संचालक श्री. गोकुळ नलवडे, सामाजिक कार्यकर्ते राजू खान, साबीर खान, श्री.केशव बंडगर, श्री. मच्छिंद्र बंडगर, श्री.यशवंत बंडगर, श्री.लखन चिर्के उपस्थित होते. नुतन सरपंच सौ.आशाबाई बंडगर यांचे अभिनंदन करून सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE