करमाळासोलापूर जिल्हा

नुकसानग्रस्त गरिब शेतकऱ्यांना वारे – कांबळे या नेत्यांचा मदतीचा हात ; नितीन कटके यांच्या आवाहनाला प्रतिसाद

प्रतिनिधी सुनिल भोसले


करमाळा तालुक्यातील जेऊर येथील गावात परतीच्या पावसाने अतिवृष्टीमुळे घरात पाणी शिरले यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष नितीन खटके यांनी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे यांना आवाज दिला आणी‌ हाकेला ओ म्हणुन लगेच ज्वारी तांदूळ दोनशे. ते तीनशे किलो उपलब्ध केल्यावर लक्षात आले. आपल्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वारे हे सुद्धा नेहमी सहकार्य करण्याच्या भुमिकेत असतात म्हणून संतोष वारे यांना फोनवरून संभाषण केले जेऊर येथे नुकसान झालेल्या नागरिकांसाठी मी मदत करत आहे आपल्या मदत करायची इच्छा आहे का वारे यांनी लगेच शंभर किलो तांदूळ, तेल, दाळ, लहान मुलांनासाठी बिस्किटे मदत दिली.

यावेळी शब्दला धावुन आल्यामुळे नितीन खटके यांनी कौतुक केले. यावेळी आतापर्यंत कोणतेही सत्ताधारी नेतेमंडळी पोहचली नाही. यामध्ये खटके यांनी गरिबांच्या मदतीसाठी बाहेरून काही मदत मिळती का याचा सतत प्रयत्न करत असतात यांनी यावेळी लक्षात आले कोरोनाच्या काळामध्ये अडचणी आलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून जावुन भरिव मदत देणारे दशरथआण्णा कांबळे यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे कांबळे यांना सांगताच गरिबांचा कळवळा असणारा नेता कांबळे यांना फोन करताच मदच जाहीर केली.

यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथआण्णा कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वारे, शेतकरी समितीचे आण्णासाहेब सुपनवर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष नितीन खटके, संभाजी ब्रिगेडचे तालुका कार्याध्यक्ष बालाजी गावडे संभाजी ब्रिगेडचे शहरध्यक्ष अतुल निर्मळ निलेश पाटील, सुहास शिंदे, पांडुरंग घाडगे , शुभम कोठावळे,सागर लोंढे, वैभव मोहिते, राकेश पाटील व लाभधारक उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE