करमाळासोलापूर जिल्हा

केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले सर्व कायदे रद्द करण्याची मागणी .. सुनिल सावंत

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले

शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने करमाळा तहसिलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले.

शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्यात यावा व केंद्र सरकारने गॅस डिझेल पेट्रोल ची केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी या मागणीचे पत्र करमाळा तहसिलदार यांना देण्यात आले. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी स्विकारले निवेदन यावेळी सोलापूर जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत, हरिभाऊ मंगवडे, हाजी फारूक बेग, फारूक जमादार, श्रीकांत ढवळे आदि उपस्थित होते.

यावेळी सुनिल सावंत बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी कायदा करून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे. सदरचा कायदा रद्द करण्यात यावा व केंद्र सरकारने गॅस डिझेल पेट्रोलची केलेली दरवाढ त्वरित रद्द करावी अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आदोंलन करण्यात येईल असा इशारा सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE