करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मराठ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र ? ; जेऊर टेंभुर्णी रस्त्यावर बस पेटवली

मराठा आंदोलनाला हिंसक वळण ?


आज दुपारपासून मराठवाड्यात, बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले असल्याच्या बातम्या येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आजमितीला आमरण उपोषण करून प्राणाची बाजी लावलेले मनोज जरांगे- पाटील हे आंदोलन शांततेत करा असे तळमळीने सांगत असताना कोपरडी प्रकरणात संपूर्ण राज्यात लाखोंचे मूक-मोर्चे काढणारा आणि १४ ऑक्टोबरची आंतरवली-सराटा येथील कोटींच्या गर्दीची सभा शांततेत पार पाडणारा सकल मराठा समाज, ज्या समाजाने जरांगे-पाटलांकडे एकहाती नेतृत्व सोपवणारा समंजस, शांतताप्रिय, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र असलेला,महाराष्ट्रातील इतर समाजाला थोरल्या भावाच्या भूमिकेतून वागवणारा मराठा आज अचानक हिंसक कसा होऊ शकतो ?

हे सारं षडयंत्र आहे हे नक्की…आरक्षणाच्या मूळ मागणीला बगल देण्यासाठी, मराठा समाजाला बदनाम करून अन्य जाती-जमातींना चिथावण्यासाठी सुरू असलेले हे कृष्ण-कारस्थान आहे.तेव्हा मराठयांनी आता रात्र वैऱ्याची आहे हे लक्षात घेऊन एकीकडे आंदोलनाची धार कायम ठेवून त्याची तीव्रता वाढवताना त्याच वेळी हिंसक कृत्य कोण करतंय आणि कुणाच्या चिथावणीमुळे ज्या-ज्या ठिकाणी घडतंय,त्या-त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून अहोरात्र सजग रहाणं गरजेचं आहे.

कारण आता मात्र खरंच रात्र वैऱ्याची आहे…
आता छुप्या दुष्मनांचा देखील बुरखा फाडणे गरजेचे आहे !
एक मराठा लाख मराठा…नव्हे तर आता
एक मराठा कोटी-कोटी मराठा ..!
– विवेक शं. येवले,करमाळा
३०/१०/२३- ९४२३५२८८३४

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE