E-Paperसोलापूर जिल्हा

साठेंची मुलगी सपकाळांची सुन , माईंच्या जीवनाची जन्मापासून संघर्षाची कहाणी – अनाथांच्या माईला भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा समाचार – विशेष

अनाथांची आई सिंधुताई सपकाळ 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रात जन्मलेला हे व्यक्तिमत्व. यांना आपण जरी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखत असलो तरी सिंधुताईंना लोक प्रेमाने माय म्हणतात. विदर्भात वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी वडील अभिमान साठे गुरं राखायचे काम करायचे.

नवरगाव एक अतिशय मागासलेलं आणि शहरी सुविधांचा स्पर्श नसलेले गाव होते. कोणालाही शिक्षणाचा गंध नाही अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले . अभिमान साठे यांचे सर्वात मोठी मुलगी सिंधुताई तिला लहानपणी चिंधी या नावाने पुकारला जायचं. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहीण आहे.

आपल्य मुलीने खुप शिकावे अशी वडिलांची खूप इच्छा होती. पण आईचा मात्र सक्त विरोध होता. म्हणूनच माईंना बालपणापासूनच गुरं राखायला पाठवलं जायचंय. तिकडे माई चोरून शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीत शिकता आले. अल्पवयात त्यांचं लग्नही झालं. चिंधा साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांचं वय होतं अकरा वर्षं आणि नवर्‍याचं वय तीस वर्ष दोघांच्या वयामध्ये बरीच तफावत होती.

घरात प्रचंड सासूरवास आणि बरीच मेहनत या सगळ्या गोष्टींचा गाडा हाकत असताना अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणं झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती होत्या. तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे राखण्याचा त्यांचा व्यवसाय होता. गुरे ही शेकड्यांनी असायची त्यांचं शेण काढता काढता अक्षरशहा कंबर मोडायची. तर शेण काढून जीव अर्धमेला होऊन जायचा. पण त्याबद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही. म्हणून माईने तेव्हाच बंड पुकारले.

माई हा लढा जिंकल्या पण त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली होती. माईंचे काम पाहून गावातला जमीनदार दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून त्यांची येणारी मिळकत बंद झाली आणि गावकऱ्यांना माईचे एक नवे नेतृत्व मिळाले. या गोष्टीचा काटा काढण्यासाठी माईंच्या पोटातील मूल आपलं असल्याचा खोटा प्रचार त्‍यात जमीनदारांनी सुरू केला. या गोष्टीमुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी तर माईंना अक्षरशः बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले. त्यांना गोठ्यात आणून टाकलं याच अवस्थेत त्यांचे बाळांतपण झाले व मुलगी जन्माला आली.

पतीने घरातून हाकलला गावकऱ्यांनी त्यांना हाकलून दिल. माराने अर्धमेल्या झालेल्या माई मग शेवटी माहेरी आल्या पण सख्ख्या आईने सुद्धा पाठ फिरवली. पोट भरण्यासाठी मग वेळ आली भीक मागायची. परभणी, नांदेड, मनमाड स्टेशनवर भीक मागत असत आणि स्टेशनवर झोपत स्टेशनवर उघड्यावर राहणं शक्य नसल्यानं अखेर माईंनी स्मशान गाठलं. मग त्या स्मशानातच राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचं काय एक मृतदेहाला अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले की तेव्हा कुठे एखादा पैसा हातात पडेल म्हणून त्यांच्या मागे मागे चालू लागायची. त्याची दया आली त्यांना थोडं पीठ दिले पैसे दिले की चिते वरच्या निखार्‍यावर भाजले आणि खडक भाकरी केली. आणि तशीच खाली.

आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला पुण्यात रस्त्यावर एक मुलगा रडत बसलेला दिसला. याला केवळ नाव सांगता येत होते दिपक गायकवाड असे त्याचे नाव होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशन ला गेल्यावर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. मात्र तेव्हा मुलाला सांभाळायक्गे ठरवले. पुढे महिन्याभरात अशीच एक दोन ते तीन मुले त्यांना भेटली. त्यांनाही माईने आपल्या पदराखाली घेतला. निराश्रित जगणं किती भयंकर असतं ते त्यांनी स्वतः अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती. निराश्रित त्यांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला म्हणजेच ममताला दगडूशेठ हलवाई मंदिर समितीचे सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे ठेवले. ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली माई ममताला सहज सांभाळु शकत होत्या.

पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर काय केलं असतं. मग ममताला पाहून मात्र माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी स्थाननिश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील 84 गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईनी आदिवासी लोकांची बाजू शासनासमोर मांडली आणि त्यांना न्याय मिळवून दिला. आता अजून एक लढाई माई जिंकल्या होत्या. अशा अनेक लढाया मात्र रोजच लढत होत्या.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. काही वर्षांपूर्वी माईंनी चिखलदऱ्यात एक वसतीगृह सुरु केले. आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. याठिकाणी आलेल्या मुलींच आडनाव साठे तर मुलांचं आडनाव सपकाळ असत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभे आहेत. माझी मुलं डॉक्टर, वकील आणि शिक्षक आहेत हे सांगताना मात्र माईंचा चेहरा खुलून येत होता. ममता सुद्धा माईंचे काम पाहते. अनेक अनाथ मुलांना वाढविले शिक्षण दिलं जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजात मानाचं स्थान मिळवून दिले आहे.

माईंच्या जीवन कार्यावर मी सिंधुताई सपकाळ या नावाचा चित्रपटही आला. या सिनेमात तेजस्विनी पंडित आणि तिच्या आईनं भूमिका साकारली या सिनेमातून अवघ्या महाराष्ट्राला सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास अनुभवायला मिळाला सिंधुताईंनी मी वनवासी आत्मचरित्र लिहिले 273 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. उपेक्षितांसाठी आणि निश्रातांसाठी झटणार्‍या अनाथांच्या माईला भावपूर्ण श्रद्धांजली …

स्त्रोत – अल्ट्रा मराठी.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE