करमाळासोलापूर जिल्हा

मांजरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. कुलकर्णी यांना राष्ट्रीय पुरस्कार

करमाळा समाचार -संजय साखरे

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई (रजि.ट्रस्ट ) यांचे वतीने राज्य व राष्ट्रस्तरीय गुणिजन गौरव पुरस्काराचे वितरण दादर माटुंगा येथील सांस्कृतिक केंद्रात संपन्न झाले .या मध्ये मांजरगाव च्या प्रथमलोकनियुक्त सरपंच सौ. गायत्री महेशकुमार कुलकर्णी यांना प्रतीभा सम्मान अचिव्हर्स अवार्ड २०२२ ,राष्ट्रस्तरीय भारत ज्योती आइडियल लेडी नारी सम्मान अवार्ड २०२२ ( भारतज्योती आदर्श महीला पुरस्कार २०२२ ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ह.भ.प. श्री.शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर , कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. रमेश आव्हाड, सुप्रसिद्ध साहित्यीक विशेष पाहुण्या मा.डॉ.सौ. महालक्ष्मी वानखेडकर, इंटरनॅशनल टॅलेन्ट आयकॉन आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचे हस्ते सन्मान पुर्वक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कारामध्ये सन्मान चिन्ह ,मेडल, महावस्त्र, सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

यापुर्वी याच ट्रस्टच्या वतीने २४ डिसेंबर २०२१ रोजी राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच या पुरस्कारने सौ. कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले होते. व राष्ट्रस्तरीय पुरस्कारासाठी मानांकन देण्यात आले होते. या वेळी श्री.मकाई सह.साखर कारखान्याचे संचालक युवानेते मा. संतोषआप्पा पाटील, दिपक झाकणे, सचिन चव्हाण, मा. सरपंच महेशकुमार कुलकर्णी उपस्थीत होते.


ग्रामविकास करत असताना सरपंच पदाला योग्य न्यायदेत गावातील मुलभूत गोष्टीवर काम करून गावाचा विकास घडवुन आणला. ग्रामविकासामध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. सरपंचपदी विराजमान झाल्यापासून आज पर्यंत केलेल्या कामा मधून गावांमधील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागला. महिला सबलीकरण साठी प्रयत्न केल्याने बचत गटाच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यवसाय उभा राहिले. अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण केल्याने नागरिकांना रस्ते सोयीचे झाले. शैक्षणिक बाबतीमध्ये शाळेचा दर्जा उंचावला. त्यामुळे लोकांचा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश यांचा कल वाढला.

अत्याधुनिक सुविधा दिल्याने मनोरंजनातून शिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पाडताआले. ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याने लहान-मोठे चोऱ्यांचे प्रमाण पूर्णपणे घटले. स्वच्छता वाढल्याने गावातील रोगराईला आळा बसला. शुद्ध पिण्याचे पाण्यामुळे पोटाच्या विकारांना किंवा इतर आजारांना बळी पडण्याचे प्रमाण कमी झाले. सभामंडपाची उभारणी केल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना व्यासपीठ उपलब्ध झाले. शाळेसाठी क्रीडांगण तयार केल्याने मुलांचा व्यायाम होऊन शारीरिक क्षमता वाढीस फायदा झाला. प्रत्येक घरी शोष खड्डे दिल्याने स्वच्छता वाढून डासांचा प्रादुर्भाव बंद झाला .कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्याने यांत्रिकीकरण सक्षम पणे राबवता आले. प्रत्येक शेतकऱ्याकडे अत्याधुनिक अवजारांचा संचय वाढला अशा प्रकारची कामे केल्याने हा पुरस्कार मिळाला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

हा पुरस्कार आमचे दैवत स्व. लोकनेते साहेबराव (आण्णा) पाटील, आमचे मार्गदर्शक श्री.रामेश्वर पाटील युवानेते मा.श्री. संतोष आप्पा पाटील तसेच सर्व ग्रामस्थ,सर्व हितचिंतक यांना समर्पित करते .
ग्रामविकास करत असताना आम्हाला ग्रा.पं चे उपसरपंच श्री. आबासो चव्हाण ग्रा.पं चे सर्व सदस्य , ग्रामसेवक श्री. राहुल कांबळे, पंचायत समिती स्तरावरील अधिकारी तसेच मेजर श्री.संतोष बागडे, अनेक जेष्ठ मार्गदर्शक मंडळींचे,सर्व ग्रामस्थांचे कायम सहकार्य मिळाले यापुढेही असेच काम करत राहुन ग्रामविकास घडवुन आणुन एकदिवस मांजरगाव आदर्श गाव करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE