E-Paperकरमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

कुकडीच्या प्रकल्पातुन शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय ; बैठकीला आ. पवार व आ. शिंदेंची उपस्थिती

करमाळा समाचार 

कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी एक फेब्रुवारीपासून आवर्तन सुरू करण्याचा निर्णय झाल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. सोमवारी ते पुणे येथील कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्पाच्या कालवा-सल्‍लागार समितीची रब्बी हंगामाच्या नियोजनाविषयी बैठक झाली.

1 फेब्रुवारी पासून पहिल्या आवर्तनात 5.64 टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, यामुळे रब्बी हंगामातील चिंता मिटणार आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे धरण 93 टक्के भरले आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पातून दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन केल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. तसेच घोड धरणातून वाहून जाणारे पावसाचे चार टीएमसी पाणी कोकडी प्रकल्पाला मिळावे यासाठी सर्वेक्षण करण्याच्या मागणीचे पत्र जलसंपदामंत्री पाटील यांना दिले आहे.

तसा सर्वे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले कुकडी प्रकल्पातील कालव्याचे पाणी वाहन क्षमता सहाशे ते सातशे असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. 1200 क्षमतेने कालवे वाहण्यासाठी अहवाल तयार करण्याची मागणी बैठकीत केली आहे. त्या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह आमदार रोहित पवार व संजयमामा शिंदे यांच्यासह इतर आमदार ही उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE